Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी रोजी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…-...

ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी रोजी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…- ईव्हीएम हटाओ,संविधान बचाओ संदर्भात निवडणूक आयुक्तांना देणार निवेदन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देशात २०१९ साली पार पाडण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीचे निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीत प्रचंड अनियमितता आढळून आली असुन छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही असाच घोळ निर्माण करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सबळ पुराव्यासह वास्तविकता चव्हाट्यावर आणली आहे.ही बाब लोकशाहीसाठी अतिशय घातक असुन यामुळे संविधान धोक्यात येण्याची दाट शक्यता लक्षात घेता ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकणार असुन दरम्यान ईव्हीएम हटाओ देश बचाओ संदर्भात निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणूक घेणे आवश्यक असताना व घेण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूकांवर प्रश्न चिन्ह लावल्या जात असताना जिल्ह्याच्या गावागावात ईव्हीएम संदर्भात जनजागृतीच्या गाड्या फिरविण्यात येत आहेत.विशेष म्हणजे सदर गाड्यांवर लावलेल्या बॅनरवर ईव्हीएमची विश्वासार्हता सांगितली जात असुन त्याचसोबत मोदी गॅरन्टी असल्याचे सांगीतले जात आहे.मा.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असुन ते सर्वांचे पंतप्रधान आहेत.असे असले तरी निवडणूका घेण्याचा अधिकार त्यांना नसुन तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.निवडणूक आयोग हे स्थिर संवैधानिक संस्था असुन देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात; यासाठी भारतीय राज्यघटनेने कायमस्वरुपी आणि स्वतंत्र संस्थेची स्थापना केली आहे.मात्र असे असताना व विकसित देशांनी देखील निवडणूका ईव्हीएम प्रभावित करु शकतात म्हणून वापर बंद केला आहे.सरकार कोणाचेही येवो मात्र निवडणूका निष्पक्ष होणे आवश्यक आहे.

घेण्यात येत असलेल्या निवडणुकांता ईव्हीएमचा वापर करण्यात येत असल्याने आपले मत कुणाला देतो याबाबत संशय आहे.ईव्हीएम मशिनला जोडल्या गेलेली व्हिव्हिपॅट मशिन ७ सेकंद पर्यंत दिलेल्या मताचे चिन्ह दाखवित असले तरी व्हिव्हिपॅट  मधून दिसणाऱ्या मतपत्रिकेची संशयास्पद स्थितीत मतमोजणी केली जात नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हिव्हिपॅटच्या मतपत्रिका एक वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवणे आवश्यक असताना व संशयास्पद स्थितीत मतपत्रिकेचीच मोजणी करणे अनिवार्य असताना तसे केले जात नाही. यावरून लोकाधिकार संपुष्टात येऊन एकाधिकारशाही निर्माण झाल्यास संविधानाने दिलेले अधिकार संपुष्टात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.करीता निवडणूका निष्पक्ष घेण्यासाठी ईव्हीएम हटाओ,देश बचाओ अंतग॔त समितीच्या वतिने देसाईगंज येथील फव्वारा चौकापासून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करुन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवडणूक आयुक्तांना येत्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरनेच घेण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.आयोजित मोर्चात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!