Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

आता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतात कोणत्या पिकांची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक आहे.मागील काही वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाची नोंदणी करण्यासाठी ‘ई पीक ॲप’ची सोय करून दिली आहे.त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या धान पिकाची नोंद करण्याची सोय आहे.प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना नोंद घेऊन व फोटो घेऊन त्याची माहिती ॲपवर टाकावयाची असते.मात्र,सदरचा ॲप वापरत असतांना तांत्रिक तसेच मोबाईल नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणींमुळे ई-पीक  पाहणी नोंदणी प्रक्रिया रखडून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असतात.यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील ई-पीक नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतांनाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला होता.प्रसंगी महसूल मंत्री बावनकुळे यांनी ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता डीसीएस(DCS)प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतांनाही शेतातील पिकाचा फोटो मोबाईलवर घेता येतो.नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होतो.त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे नोंदणी थांबण्याची समस्या कमी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे ई-पीक पाहणी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!