- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज,बुधवार २५ मार्च २०२६ रोजी शेवटचा दिवस असून मागील महिन्याच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला होता.आजच्या अंतिम दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून,नाशिकमधील खरात प्रकरण आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून सभागृहात कामकाजाचा तुफान धडाका पाहायला मिळणार आहे.सभागृहात विविध शासकीय व अशासकीय विषयांवर चर्चा रंगणार असून, सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत.त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सदरचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले.काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या तोंडावर इस्त्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची काहीच गरज नव्हती.देशाच्या नेतृत्वाच्या चुकीमुळे आज सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशात कोरोना महामारीच्या काळासारखी स्थिती उद्धवण्याची शक्यता असून,इंधन तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील,असे ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणालेत.अश्यातच आज शेवटच्या दिवशी अंतिम आठ प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
- Advertisement -

