- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अंत्यविधीसाठी कारने निघालेल्या दोन कुटुंबियांवर काळाने झडप घातली असल्याची घटना आज,सोमवार १९ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला.तर,पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मेधा परमेश पराडकर वय ४० वर्षे,सौरभ परमेश पराडकर वय २२ वर्षे,मिताली विवेक मोरे वय ४५ वर्षे,निहार विवेक मोरे वय १९ वर्षे,श्रेयस राजेंद्र सावंत वय २३ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर परमेश पराडकर आणि विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले.दोन्ही कुटूंबीय मुंबई येथे वास्तव्यास असून पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत,तर मोरे कुटूंबीय मिरा-भाईंदर येथील आहेत.
दोन्ही कुटूंबीय मुंबई मिरारोड येथून किया कार क्रमांक-एम एच ०२३२६५ ने रत्नागिरीच्या देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते.अश्यातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरीच्या खेड येथील
भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली.घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.त्यानंतर क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.मात्र,झालेल्या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलवण्यात आले.तर विवेक मोरे यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवीण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास रत्नागिरीच्या खेड पोलिसांकडून सुरू आहे.
- Advertisement -

