उद्रेक न्युज वृत्त :-यापूर्वी विदर्भातील पाच जिल्ह्यात ६ जुलै ते ९ जुलै दरम्यान पावसाने जो जोर धरला तो शेवटी पूर येईपर्यंत सोडलेला नव्हता.तेव्हापासून पावसाने दडी मारल्याने बऱ्यापैकी शेतीची कामे खोळंबली आहेत. अश्यातच आता हवामान खात्याकडून पावसाची एंट्री होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज,सोमवार २१ जुलै पासून ते २३ जुलै या काळात विदर्भातील आठ जिल्ह्यांत पाऊस धूम ठोकणार आहे.सध्या स्थितीत पाऊस अधूनमधून जिकडे पडला तिकडेच पडत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चांगला पाऊस पडण्याची वाट पाहत आहे.ज्यावेळी पावसाची अपेक्षा असते, अश्यावेळी पाऊस पडत नाही तर भलत्याच वेळी पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान करून सोडते. यापूर्वी पावसाने धुमाकूळ घातल्याने गडचिरोली,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पाऊस पडतो तो शेतकऱ्यांचे नुकसान करूनच सोडतो.त्यामुळे शेतकऱ्यांची करावे तरी काय?असा प्रश्न निर्माण झाला असतांनाच आता शेतकरी बांधव पाऊस पडण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
आजपासून पाऊस ठोकणार धूम..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

