- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहराच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आज,शनिवार २० डिसेंबर व उद्या,रविवार २१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. आज दुपारी ४ वाजता ग्रंथदीडी,५.३० वाजता उद्घाटन सोहळा,सायंकाळी ७ वाजता कविता संमेलन,रात्री ८ वाजता मी रमाई बोलते एकपात्री प्रयोग, ८.३० वाजता परिसंवाद, ९.३० वाजता जयभीम जलसा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई आणि लोकजागृती नाट्य कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन पार पाडले जाणार आहे. मागील वर्षात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात पार पडले होते.
आज २० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर बसस्थानकापासून नाट्य सभागृहापर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथदींडीतून या महोत्सवाची सुरुवात होणार आहेत.संध्याकाळी ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन गृहविभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,जिल्हाधिकारी विनय गौडा,प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे,पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रा.डॉ.इसादास भडके उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
- Advertisement -

