Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरआजपासून दोन दिवसीय 'जय भीम' साहित्य संमेलन..

आजपासून दोन दिवसीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहराच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आज,शनिवार २० डिसेंबर व उद्या,रविवार २१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. आज दुपारी ४ वाजता ग्रंथदीडी,५.३० वाजता उद्घाटन सोहळा,सायंकाळी ७ वाजता कविता संमेलन,रात्री ८ वाजता मी रमाई बोलते एकपात्री प्रयोग, ८.३० वाजता परिसंवाद, ९.३० वाजता जयभीम जलसा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई आणि लोकजागृती नाट्य कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन पार पाडले जाणार आहे. मागील वर्षात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात पार पडले होते.
आज २० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर बसस्थानकापासून नाट्य सभागृहापर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथदींडीतून या महोत्सवाची सुरुवात होणार आहेत.संध्याकाळी ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन गृहविभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,जिल्हाधिकारी विनय गौडा,प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे,पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रा.डॉ.इसादास भडके उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!