Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरआजपासून दोन दिवसीय 'जय भीम' साहित्य संमेलन..

आजपासून दोन दिवसीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहराच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आज,शनिवार २० डिसेंबर व उद्या,रविवार २१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. आज दुपारी ४ वाजता ग्रंथदीडी,५.३० वाजता उद्घाटन सोहळा,सायंकाळी ७ वाजता कविता संमेलन,रात्री ८ वाजता मी रमाई बोलते एकपात्री प्रयोग, ८.३० वाजता परिसंवाद, ९.३० वाजता जयभीम जलसा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई आणि लोकजागृती नाट्य कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन पार पाडले जाणार आहे. मागील वर्षात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात पार पडले होते.
आज २० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर बसस्थानकापासून नाट्य सभागृहापर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथदींडीतून या महोत्सवाची सुरुवात होणार आहेत.संध्याकाळी ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन गृहविभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,जिल्हाधिकारी विनय गौडा,प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे,पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रा.डॉ.इसादास भडके उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!