- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बीड :-जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असतांनाच अवैध वाळू उपसा व खंडणीचे प्रकरण चांगलेच रंगू लागले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांची तात्काळ बदली करण्यात आली असून नवे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांना नियुक्त देण्यात आली आहे. कावंत यांनी रुजू होताच कामात हयगय करणाऱ्यांची खैर नसल्याचे स्पष्ट केले असतांनाच बीड जिल्ह्याच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू उपसा प्रकरणात अरोपिंशी हातमिळवणी करून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई केली नसल्याने बीडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे.त्यातच बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांनी अवैध वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले.सदर दोन्ही पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरांवर वाळूसह कारवाईचे आदेश असतांना पोलीस कर्मचाऱ्यांनी खाली ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले.तसेच कारवाई करण्यास विलंब लावला.त्यामुळे वाळू माफियांशी हितसंबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.प्रकरणी पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
- Advertisement -

