- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.शेतामध्ये उभे असलेले धान,तूर,सोयाबीन,भाजीपाला आदी पिके पावसामुळे आडवी झाली असून अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांचे दुःख सावरण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.तसेच विधानसभा क्षेत्राच्या देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची या चारही तालुक्यातील तहसीलदारांना यासंदर्भात तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आमदार मसराम म्हणाले की, “शेतकऱ्यांनी दिवसरात्र घाम गाळून धान पिकांची वाढ केली.अश्यातच अवकाळी पावसाने पिकं नष्ट झाली आहेत. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे आवश्यक असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याला योग्य तो मोबदला द्यावा. तहसीलदार,कृषी अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे योग्य पंचनामे तयार करावेत,असेही निर्देश आमदार मसराम यांनी दिले आहेत.
- Advertisement -

