Monday, May 25, 2026
Homeमुंबईअबब....४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले...

अबब….४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले काय?- अजित पवारांचा खोचक टोला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- ‘वर्षा बंगल्याचे ४ महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणे ही नवलाची बाब असून मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो.आमचे सहकारी मुख्यमंत्री होते.परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते काय? काही कळायला मार्ग नाही.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक रित्या करीत आहेत.”असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर खोचक टोला व टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले,गेल्या ८ महिन्यात ५० कोटी राज्य सरकारने जाहीरातीवर  खर्च केला.मुंबई  महानगर पालिका कडून माहीती घेतली तर १७ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केला गेला आहे.एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु,पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.त्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली.  बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना ते बोलत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!