Monday, May 25, 2026
Homeभंडाराअन् मृतदेह ठेवून सैरावैरा पळू लागले नागरिक….-कुणी तणसीच्या ढिगात लपले तर कुणी...

अन् मृतदेह ठेवून सैरावैरा पळू लागले नागरिक….-कुणी तणसीच्या ढिगात लपले तर कुणी नदीच्या पाण्यात घेतली उडी……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केला असल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी घडली.होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अंजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला.हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले.यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर मृतदेह ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने,तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले.काहींनी वैनगंगा नदीच्या पाण्याचा उडी घेतली.परंतु, बराच वेळ मधमाश्यांनी पिच्छा सोडला नव्हता.त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.यात ३० नागरिक किरकोळ जखमी झाले, तर पाच नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे.मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते 30 नागरिक किरकोळ जखमी झाले.गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे.ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण,सुशीला बनसोड,सुभाष चव्हाण, शुभम रामटेके,घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्या आले.मधमाश्यांचा हल्ला थांबल्यानंत मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारा मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!