- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या धान पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन सेतू केंद्रात पाठविण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल,अश्यांनी सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.विशेष म्हणजे,जो पर्यंत ई-केवायसी केली जाणार नाही,तो पर्यंत नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
मागील वर्षात हलके व मध्यम मुदतीचे धान ऐन कापणीला आल्यानंतर तसेच काही धानाची कापणी झाल्यानंतर नेमके याचवेळी वादळी वाऱ्यासह परतीच्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे धान पीकाचे मोठे नुकसान झाले होते.सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत राहिल्याने बांधात साचलेले पाणी पाट तयार करून काढण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.मात्र,अनेक शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल ठरले. विविध तालुक्यातील हजारो हेक्टरवरील धान पिकाचे यात नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यात आले होते.मात्र,गेली पाच महिने लोटूनही नुकसानभरपाई मिळण्याचे नावच घेत नव्हती. अश्यातच आता मागील वर्षातील नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार आहे.
- Advertisement -

