Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. - याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी...

अखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. – याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या धान पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन सेतू केंद्रात पाठविण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल,अश्यांनी सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.विशेष म्हणजे,जो पर्यंत ई-केवायसी केली जाणार नाही,तो पर्यंत नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
मागील वर्षात हलके व मध्यम मुदतीचे धान ऐन कापणीला आल्यानंतर तसेच काही धानाची कापणी झाल्यानंतर नेमके याचवेळी वादळी वाऱ्यासह परतीच्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे धान पीकाचे मोठे नुकसान झाले होते.सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत राहिल्याने बांधात साचलेले पाणी पाट तयार करून काढण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.मात्र,अनेक शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल ठरले. विविध तालुक्यातील हजारो हेक्टरवरील धान पिकाचे यात नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यात आले होते.मात्र,गेली पाच महिने लोटूनही नुकसानभरपाई मिळण्याचे नावच घेत नव्हती. अश्यातच आता मागील वर्षातील नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!