Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. - याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी...

अखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. – याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या धान पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन सेतू केंद्रात पाठविण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल,अश्यांनी सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.विशेष म्हणजे,जो पर्यंत ई-केवायसी केली जाणार नाही,तो पर्यंत नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
मागील वर्षात हलके व मध्यम मुदतीचे धान ऐन कापणीला आल्यानंतर तसेच काही धानाची कापणी झाल्यानंतर नेमके याचवेळी वादळी वाऱ्यासह परतीच्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे धान पीकाचे मोठे नुकसान झाले होते.सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत राहिल्याने बांधात साचलेले पाणी पाट तयार करून काढण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.मात्र,अनेक शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल ठरले. विविध तालुक्यातील हजारो हेक्टरवरील धान पिकाचे यात नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यात आले होते.मात्र,गेली पाच महिने लोटूनही नुकसानभरपाई मिळण्याचे नावच घेत नव्हती. अश्यातच आता मागील वर्षातील नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!