Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

अखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज शुक्रवारी झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरून तब्बल सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे.भारताने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे.भारताने यापूर्वी २०००,२००८,२०१२,२०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता.अश्यातच आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-१९ क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्ण घेतला.प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.लक्ष्यप्राप्ती करतांना इंग्लंडला फक्त ३११ धावा करता आल्या.यात भारताने तब्बल १०० धावांनी विश्वचषक जिंकला.भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या.कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा केल्या.४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवरच गारद झाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!