Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

अखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज शुक्रवारी झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरून तब्बल सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे.भारताने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे.भारताने यापूर्वी २०००,२००८,२०१२,२०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता.अश्यातच आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-१९ क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्ण घेतला.प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.लक्ष्यप्राप्ती करतांना इंग्लंडला फक्त ३११ धावा करता आल्या.यात भारताने तब्बल १०० धावांनी विश्वचषक जिंकला.भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या.कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा केल्या.४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवरच गारद झाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!