उद्रेक न्युज वृत्त :-पावसाळी अधिवेशनाची तारीख आज,गुरुवार २६ जून रोजी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली असून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे येत्या,सोमवार ३० जून पासून ते १८ जुलै पर्यंत मुंबईत चालणार आहे.तब्बल १९ दिवसांच्या कालावधीतील शनिवार आणि रविवार असे चार दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळून प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असणार आहेत.यंदाचे पावसाळी अधिवेशन हे चांगलेच गाजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार २९ जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.विशेष म्हणजे, अधिवेशन दरम्यान विरोधकांकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती सुरुवातीला करण्यात आली होती.मात्र,प्रचंड टीका झाल्यानंतर राज्य सरकारने शुद्धीपत्रक काढून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेची अट मागे घेतली होती. त्यामुळे सदर मुद्दा,तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर,धाराशिव,बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात असल्याने हाही मुद्दा चांगलाच गाजू शकतो.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बोनसची रक्कम, कर्जमाफी व नुकतेच देसाईगंज तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राकरीता जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या भूसंपादन करण्यात येणाऱ्या शेतजमिनी विषयी विरोधकांकडून वाचा फोडली जाणार की नाही? हे येत्या कालावधीत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अखेर पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर.. – देसाईगंज तालुक्यातील जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचा मुद्दा गाजणार काय?
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

