- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीतील दर पाच वर्षांनी निवडून येणाऱ्या व गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचाची वर्णी लागणार असल्याचे आदेश शासनाने दिले असतांनाच अखेर ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरपंचाची नियुक्ती करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिले आहेत.त्या अनुषंगाने बऱ्याच ग्रामपंचायतीत उद्या,सोमवार ९ मार्च रोजी सरपंच प्रशासक तर उपसरपंच व सदस्य प्रशासकीय समितीमध्ये विराजमान होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील असंख्य ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपली आहे. मात्र,मुदत्त संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सध्या शक्य नसल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच यांची नियुक्ती करण्याठ यावी, असे आदेश शासनाने दिले होते.या आदेशानुसार प्रशासक व प्रशासकीय समितीचा कार्यकाळ ६ महिन्यांचा राहील.परंतु,निवडणूक प्रक्रिया ६ महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित दिवशीच प्रशासक व प्रशासकीय समिती संपुष्टात येईल.तोपर्यंत सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार असल्याने सरपंच संघटनेत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.
- Advertisement -

