Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची वर्णी..

अखेर ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची वर्णी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीतील दर पाच वर्षांनी निवडून येणाऱ्या व गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचाची वर्णी लागणार असल्याचे आदेश शासनाने दिले असतांनाच  अखेर ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरपंचाची नियुक्ती करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिले आहेत.त्या अनुषंगाने बऱ्याच ग्रामपंचायतीत उद्या,सोमवार ९ मार्च रोजी सरपंच प्रशासक तर उपसरपंच व सदस्य प्रशासकीय समितीमध्ये विराजमान होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील असंख्य ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपली आहे. मात्र,मुदत्त संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सध्या शक्य नसल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच यांची नियुक्ती करण्याठ यावी, असे आदेश शासनाने दिले होते.या आदेशानुसार   प्रशासक व प्रशासकीय समितीचा कार्यकाळ ६ महिन्यांचा राहील.परंतु,निवडणूक प्रक्रिया ६ महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित दिवशीच  प्रशासक व प्रशासकीय समिती संपुष्टात येईल.तोपर्यंत सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार असल्याने सरपंच संघटनेत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!