- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्य सरकारकडून पिकाची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी करीत ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने काल,शुक्रवारी २९ नोव्हेंबरच्या सायंकाळी सावनेर शहरातील बसस्थानक परिसरात अटक केली.देवीदास पांडुरंग अंभोरे वय ३४ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव असून,त्याची तलाठी कार्यालय खुबाळा,ता.सावनेर येथील कार्यालयात नियुक्ती होती.तक्रारकर्ता शेतकरी खुबाळा येथील रहिवासी असून,त्यांची याच गावाच्या शिवारात शेती आहे.राज्य सरकारने पिकांची नुकसानभरपाई जाहीर केली होती.ही नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याने तलाठी देवीदास अंभोरे याच्याशी संपर्क केला.सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली आणि नंतर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी केली.तडजोडीनंतर शेतकऱ्याने सात हजार रुपये देण्याचे मान्य केले.
त्याला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली.या प्रकरणाची खातरजमा करून एसीबीच्या पथकाने काल शुक्रवारी सावनेर शहरात सापळा रचला. देवीदासने शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारता एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.त्याच्याकडून ७ हजार रुपये जप्त केले.ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते,हवालदार अस्मिता मल्लेलवार,वंदना नगराळे,सरिता राऊत, अनिल बहिरे,अमोल मेंघरे,सचिन चन्ने,विजय सोळंकी यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

