Sunday, April 19, 2026
Homeपुणेहृदय हेलावणारी घटना..! मुलासह दोन नातीनच्या अपघाताची घटना असह्य झाल्याने वडिलांनीही सोडला...

हृदय हेलावणारी घटना..! मुलासह दोन नातीनच्या अपघाताची घटना असह्य झाल्याने वडिलांनीही सोडला प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-दोन मुलींना घेऊन जात असलेल्या वडिलांच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली येऊन वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला,तर दोन मुलींचा रुग्णालयात नेत असतांना वातेच मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना काल रविवार २७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली होती.अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली,सई वय ११ वर्षे आणि मधुरा वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह एमएच ४२ बी ४८४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून शहराच्या खंडोबानगर चौकातून जात होते.त्याचवेळी वेगाने येणाऱ्या एमएच १६ सी ए०२१२ क्रमांकाच्या एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेत तिघेही हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला,तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अश्यातच मयत ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांनी काल झालेल्या अपघातात मुलगा व दोन नातीन यांचे तिन्ही मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.दरम्यान,या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज, सोमवार २८ जुलै रोजी निधन झाले.ते सेवानिवृत्त शिक्षक होते.आचार्य कुटुंबीय बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात वास्तव्यास असून एकाच वेळी चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहरवासीय शोकसागरात बुडाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!