- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-यंदा पावसाने जिल्ह्यावर चांगलीच मेहरबानी दाखविली यात काही शंका नाही. अपेक्षित पावसापेक्षा जास्त पाऊस झाला असून,या पावसामुळे वर्षभराची पिण्याच्या पाण्यासह शेतीचीही चिंता मिटली आहे.पावसामुळे नदी-नाले व प्रकल्प चांगलेच भरून आहेत.शासकीय नोंदीनुसार पाऊस संपला असून,३० सप्टेंबरपर्यंतच पावसाची नोंद घेतली जाते.त्यानुसार,जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला आहे.मात्र,एवढा पाऊस बरसून सुद्धा वातावरणातील उकाडा काही केल्या कमी होत नसल्याचे अनुभवायला मिळत आहे.पाऊस पडला तोपर्यंत वातावरणात गारवा निर्माण व्हायचा; मात्र,आता उकाड्याने सूर्य कोपला असल्याचे दिसून येत आहे. अधूनमधून पाऊस बरसतो आणि पाऊस थांबताच परत पारा चढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.त्यामुळे बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
- Advertisement -

