Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा खुलासा; वाचा संपूर्ण प्रकरण...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा खुलासा; वाचा संपूर्ण प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.अटक केलेल्या सर्व आरोपींना सीआयडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे.
                संपूर्ण प्रकरण👇
६ डिसेंबर २०२४ ला सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यास मारहाण केली. त्यामुळे अशोकने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले.मात्र,त्या ठिकाणी भांडण विकोपाला गेले आणि यात दोन गटात भांडण झाले.त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यात आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तक्रार दिली.त्यानुसार सुदर्शन घुले व इतर तीन जणांविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.९ डिसेंबरला दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचे केज-मांजरसुबा हायवेवरच्या टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी अपहरण केले.अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.पोलीस सुद्धा संतोष देशमुख याचा शोध घेऊ लागले.याच दरम्यान रात्री सहा साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला.६ डिसेंबरला ज्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबतच्या साथीदाराला मारहाण झाली त्यामध्ये प्रतिक घुले हाही होता आणि याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला प्रतीक घुले याचा वाढदिवस होता.वाढदिवसा दिवशीच आपल्याला मारहाण झाल्याचा राग प्रतीक घुलेच्या डोक्यात राहिला. त्यामुळेच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर प्रतीक घुले याने मारहाण करायला सुरुवात केली.संतोष देशमुखला मारहाण करतांना सुदर्शन घुले हा प्रत्येक वेळी विचारत होता की तू आम्हाला मारण्याची डेरिंग कशी केलीस आणि त्यानंतर व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून केला हे वारंवार संतोष देशमुखला विचारत होता.६ तारखेला मारहाण झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुख यांना फायटर,गॅसचा पाईप आणि काठीने मारहाण केली.संतोष देशमुख यांचे अपहरण होण्यापूर्वी मस्साजोग मधीलच सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन घुले ला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगत होता.यादरम्यान संतोष देशमुख केजमधून निघाले यासह सगळ्या लोकेशनची माहिती ही सिद्धार्थ सोनवणे याने पुरवली होती.सुदर्शन घुले यांच्या स्कार्पिओ गाडीच्या मागे एक स्विफ्ट पांढरी गाडी होती जी जयराम चाटे याची आहे.संतोष देशमुख यांचा अपहरण झाल्यानंतर स्कार्पिओ गाडीच्या मागे जयराम चाटे याची गाडी होती. जयराम याने त्याच्या व्हाट्सअप ग्रुप वरील “मोकार पंती” या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना मारहाण होण्याच्या आधीचा व्हिडिओ दाखवला.या ग्रुपमधील चार ते पाच जण यांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल बघितला. संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली त्यात प्रतीक घुले त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा प्रमुख हात होता.त्यानुसार आता वाल्मीक कराड सोडून इतर सात आरोपींवर मोकका(मोक्का) लावण्यात आला आहे.मोक्का म्हणजेच संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हत्या,खंडणी व इतर गुन्ह्यांसाठी लावण्यात येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!