Saturday, May 2, 2026
Homeनागपूरसतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. - अखेर गुन्हे शाखेच्या...

सतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. – अखेर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लावला शोध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कुणाच्याही आई-वडिलांना नेहमीच वाटत असते की,आपली मुले सुशिक्षित होऊन आई- वडिलांचे मोठे नाव लौकीक करावीत; त्यासाठी सर्वकाही पणाला लावून सांभाळ करीत असतात.अशातच आजची तरुणाई छोट्या-छोट्या कारणांसाठी टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्यांना त्रास देत असल्याच्या घटना हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
आई-वडिलांनी मोबाइलसाठी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरून पलायन केले.परंतु गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ३९ वर्षीय व्यक्तीचा १६ वर्षीय मुलगा १२ वीला शिकतो.तो सतत मोबाइल पाहत असल्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले.त्याचा राग मनात धरून तो १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला.त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, अशा तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपास करून या अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता तो बिडगाव येथे आढळला.त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या अल्पवयीन बालकाला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे आणि त्यांच्या पथकाने केली.रागाने घरून निघून जाण्याची अल्पवयीन बालकाची ही दुसरी वेळ आहे. महिनाभरापूर्वीही तो घरच्यांनी रागावल्यामुळे निघून गेला होता.त्यावेळी दोन दिवस त्याने एका कॅन्टीनमध्ये काम केले होते.लहान असतांना त्याला कावीळ झाला होता.तेव्हापासून तो मतिमंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!