- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कुणाच्याही आई-वडिलांना नेहमीच वाटत असते की,आपली मुले सुशिक्षित होऊन आई- वडिलांचे मोठे नाव लौकीक करावीत; त्यासाठी सर्वकाही पणाला लावून सांभाळ करीत असतात.अशातच आजची तरुणाई छोट्या-छोट्या कारणांसाठी टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्यांना त्रास देत असल्याच्या घटना हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
आई-वडिलांनी मोबाइलसाठी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरून पलायन केले.परंतु गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ३९ वर्षीय व्यक्तीचा १६ वर्षीय मुलगा १२ वीला शिकतो.तो सतत मोबाइल पाहत असल्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले.त्याचा राग मनात धरून तो १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला.त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, अशा तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपास करून या अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता तो बिडगाव येथे आढळला.त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या अल्पवयीन बालकाला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे आणि त्यांच्या पथकाने केली.रागाने घरून निघून जाण्याची अल्पवयीन बालकाची ही दुसरी वेळ आहे. महिनाभरापूर्वीही तो घरच्यांनी रागावल्यामुळे निघून गेला होता.त्यावेळी दोन दिवस त्याने एका कॅन्टीनमध्ये काम केले होते.लहान असतांना त्याला कावीळ झाला होता.तेव्हापासून तो मतिमंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- Advertisement -

