Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसंभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता एकाच वेळी तीन महिन्यांचे मिळणार राशन..

संभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता एकाच वेळी तीन महिन्यांचे मिळणार राशन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-संभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता,एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.त्यामध्ये जून,जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत धान्याचा समावेश राहणार आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य अतिवृष्टी, पूरपरिस्थिती लक्षात घेता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यादृष्टीने पुरवठा विभागाकडून तयारी सुरू आहे.येत्या १५ जूनपर्यंत राज्यात मॉन्सून
सक्रिय होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी,नदी-नाल्यांना पूर येऊन आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू शकते.अशावेळी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तीन महिन्यांचे रेशन ३० जूनपूर्वी वितरित करण्यात येणार आहे.राज्यातील पुरवठा विभाग कामाला लागला आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व रेशन दुकानांत धान्य पोहोचविण्यात येत आहेत.१५ जूनपर्यंत पूर्ण धान्य पोहोचेल,यासाठी नियोजन सुरू आहे.तसेच वेळेत सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळेल असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.यंदा पहिल्यांदाच तीन महिन्यांचे राशन एकाचवेळी मिळणार असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!