Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसंजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्याची मागणी..

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागा अंतर्गत संजय गांधी विभागात कार्यरत ४१९ आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राज्याच्या संजय गांधी विभागात आयटी असिस्टंट कर्मचारी हे २०१४ पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये संगणकीय तांत्रिक कार्य पार पाडत आहेत.अत्यल्प मानधन असूनही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची माहिती अद्ययावत करणे,डीबीटी पोर्टल, एनसएपी व पीफएमस प्रणालीद्वारे पेंशन वितरण यासारखी महत्त्वाची कामे करीत आहेत.मात्र,गेल्या दहा वर्षांपासून मानधनात वाढ झालेली नाही.त्यामुळे सेवेला स्थैर्य,शासनमान्य वेतनश्रेणी,वार्षिक वेतनवाढ, सेवा सुरक्षा,भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय सुविधांचा समावेश,मानधन थेट शासन स्तरावरून वितरित करावे इत्यादी मागण्या मान्य करण्यात याव्यात,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अनिल उबाळे व किरणराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या ज्योती जाधव, योगिता चव्हाण,सीमा शरणागत,कृष्णा पवार,आमेर शेख,करण सोनवणे,पोपट जामकर,आसिफ पठाण आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!