Saturday, March 15, 2025
Homeमुंबईशेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिएम किसान सन्मान निधी प्रमाणेच राज्य सरकारही देणार ६ हजार...
spot_img

शेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिएम किसान सन्मान निधी प्रमाणेच राज्य सरकारही देणार ६ हजार रुपये- शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार १२ हजार रुपये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे.केंद्र सरकारचे ६ हजार रुपये आणि राज्याचे ६ हजार रुपये,याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करीत आहेत.यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.देवेंद्र फडणवीस म्हणाले,आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल.शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे.त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल.पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी ६ हजार रुपये,अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले,राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना महासन्मान निधीचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकार दरवर्षी ६२०० कोटी खर्च करेल.याशिवाय पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याची दोन टक्के रक्कम भरावी लागत होती.मात्र, आता ती रक्कमही शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही.अर्जासाठी केवळ एक रुपया खर्च करुन शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल.त्यांचा विम्याचा पूर्ण हिस्सा सरकार भरेल. यासाठी राज्य सरकारवर ३३१२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार असल्याचेही म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!