Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दोन हजाराची प्रतीक्षा..!

शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दोन हजाराची प्रतीक्षा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरू केली.योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे; मात्र,राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ८ वा हप्ता जमा होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; मात्र ती अद्याप फोल ठरू लागली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य सरकार वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करते. योजनेतून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.मात्र,अद्याप अजूनही आठव्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा करण्यात आले नसल्याने आणखी किती दिवस वाट पहावी?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून सोडत आहे.त्यातच,नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका कधी जमा होणार? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे,वाढती महागाई,खत-बियाण्यांचे दर,कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळे हप्ता तातडीने जमा करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!