- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट म्हणजेच अल्ट्राटेक कंपनीच्या चुनखडी क्षेत्रासाठी शेतजमिनी देऊनही योग्य मोबदला न मिळाल्याने कुसुंबी येथील पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज,सोमवार १३ एप्रिल रोजी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच(एसडीओ)विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,गेल्या १५ वर्षांपासून जमीन मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने कोलाम बांधवांच्या संयमांचा बांध फुटला.राजुरा उमविभाअंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील कोलाम कुटुंबाच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या चुनखडी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या होत्या.मात्र या जमिनिंचा योग्य मोबदला अद्यापही मिळालेला नाही.एकतर मोबादला द्या किंवा आमच्या जमिनी परत करा,या मागणीसाठी हे आदिवासी शेतकरी गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. पाचही शेतकरी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयात आपली व्यथा घेऊन गेले होते.तिथेच त्यांनी विष प्राशन केले. सदरचा प्रकार लक्षात येताच कार्यालयात मोठी खळबळ उडाली.राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.सदरच्या घटनेवरून प्रशासन शेतकऱ्यांप्रति किती संवेदनशील आहे; हे लक्षात येते.
- Advertisement -

