Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजशेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी - नरेश वासनिक यांची मागणी

शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी – नरेश वासनिक यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- भारतहा कृषिप्रधान देश आहे.देशातील ७५% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी बांधवांना देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते.अशातच बरेच शेतकरी भाऊ हिष्याच्या कलहामुळे वा इतर घरगुती वादांमुळे बहुतांश शेतकरी शेतजमीनी पडीत ठेवतांना दिसून येत आहेत.मुख्यत्वे शेतकरी बांधवांना नेहमी आर्थिक अडचणींना सामोरेही जावे लागत आहे.यासाठी शासन स्तरावरून शेतकऱ्यांकरीता ठोस पावले उचलून शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोफत करून द्यावी; अशी मागणी  समाजवादी पार्टीचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्हा पाठोपाठ चंद्रपूर,भंडारा,गोंदिया अशी तीन जिल्हे लागून आहेत.चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधव ८०% ते ९०% शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.सदर जिल्हे धान उत्पादनास प्रख्यात मानली जातात.शेतकरी बांधवांचा विकास व्हावा; या उद्देशाने शासन स्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात.मात्र राबविण्यात येणाऱ्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येतात.शेतकरी वर्ग सततची नापिकी,दुष्काळ,किडीचा प्रादुर्भाव व इतर अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कर्जबाजारी होऊन टोकाचे पाऊल घेत असतात.यासाठी शासन स्तरावरून ज्याप्रमाणे शेतकरी बांधव यांच्या करीता अनेक योजना राबविल्या जातात; तश्याच प्रकारची योजना अनुसुचित जाती,जमाती व खुल्या प्रवर्गा करीता महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनिंची मोफत मोजणी करून देण्याची योजना राबविण्यात यावी; असे देसाईगंज समाजवादी पार्टीचे  शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!