Tuesday, March 18, 2025
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….
spot_img

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकरित्या हल्ला करताच गुराखी जागीच ठार झाला.सदरची घटना आज दिनांक- २० ऑक्टोंबर २०२३ रोजी मूल तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ५२३ मध्ये दुपारी ३ च्या सुमारास घडली.बंडू विठ्ठल भेंडारे वय ५८ वर्षे रा.कांतापेठ असे मृत गुराख्याचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडू विठ्ठल भेंडारे नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी गावा लगतच्या जंगल परिसरात गेला होता.जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बंडूवर दुपारच्या सुमारास अचानक हल्ला चढवला.वाघाच्या हल्ल्यामुळे दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगल परिसराकडून गुरे गावाच्या दिशेने पळू लागली.त्यामुळे काही नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.तो पर्यंत बंडू भेंडारे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेला होता.सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल आर.जी.कुमरे,वनरक्षक यु.आर.गवई,पोलीस निरीक्षक सुमित परतेकी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा झाल्यानंतर मृत्तदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!