- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत; अशी स्पष्टोक्ती माजी महिला व बालविकासमंत्री,आमदार अदिती तटकरे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केली आहे.एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे.याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये; असेही आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.या योजनेमुळे महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यास लाडक्या बहिणींनी हातभार लावला आहे. मात्र,महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेच्या निकषांत बदल करणार असल्याचे रील्स व व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत.या योजनेचे निकष बदलण्यात आले असून, ते पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.या पार्श्वभूमीवर,तटकरे यांनी योजनेच्या निकषांमध्ये बदल झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
- Advertisement -

