- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गेल्या अनेक महिन्यांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांची मजुरी थकीत असल्याने मजुरांपुढे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली होती.अश्यातच ‘होळी’च्या सणापूर्वी मजुरांच्या मजुरीचा तसेच रोजगार हमी योजनेतील इतर कामांसाठी निधी मिळावा,अशी मागणी जोर धरत असतांनाच राज्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षातील चौथ्या हप्त्याच्या स्वरूपात हे अनुदान प्राप्त झाले असून,यामुळे अकुशल कामे करणाऱ्या थकीत मजुरीचा प्रश्न तर सुटला,त्याचबरोबर पुढील कामे करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे.केंद्राकडून प्राप्त झालेल्या या निधीमुळे नवीन कामांना मंजुरी मिळणे सोपे होणार आहे.विशेषतः दुष्काळी आणि दुर्गम भागातील मजुरांना वेळेवर मजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत,यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.
- Advertisement -

