- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे.जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून घेतला जाईल व बोगस लाभार्थ्यांना चपराक बसेल.यासाठी थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या महिन्याच्या ३१ ऑक्टोंबर २०२४ पर्यंतच मुदत देण्यात आली होती.त्यानंतर स्वस्त धान्याचा लाभ १ नोव्हेंबर २०२४ पासून बंद होणार होता.मात्र,आता ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शिधापत्रिका धारक आता १ डिसेंबर २०२४ पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत.त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया लवकरात-लवकर पूर्ण करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

