Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज' अभियानास मुदतवाढ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानास मुदतवाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेत जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविणे,स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून हे अभियान सुरू झाले आहे.या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत  होता.अश्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत ग्रामीण भागातील ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या निर्णयामुळे प्रलंबित असलेली कामे पूर्ण करता येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.यात प्रलंबित घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणारी ५० टक्के सवलत आता पुढील काही महिने घेता येणार आहे.शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेत जास्तीत जास्त नागरिकांनी आपली थकबाकी भरून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हे अभियान सुरू केले आहे.आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.मुदतवाढीमुळे ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ होऊन विकासकामांना गती मिळणार आहे.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याने कार्यक्षमता, पारदर्शकता व स्पर्धात्मक विकासाला चालना मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!