Sunday, June 21, 2026
Homeवर्धामानलं आमदाराला..! शेतकरी मारहाण प्रकरणी विधिमंडळात मुद्दा; ठाणेदारासह वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित..

मानलं आमदाराला..! शेतकरी मारहाण प्रकरणी विधिमंडळात मुद्दा; ठाणेदारासह वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-गोर-गरिबांना कचाट्यात पकडणे व मोठ्यांना सोडून देणे,असा प्रकार सर्वत्र दिसून येतो आहे; यावर कुठेतरी आळा घातला जाणे आवश्यक आहे; अन्यथा कुणी कोणालाही मोजणार नाही.’हम करेसो कायदा’ अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.एखादा वचप अत्यावश्यक आहे.लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर काही प्रमाणात कां असेना..! जनतेचा नक्कीच कल्याण होईल,मात्र काही लोकप्रतिनिधी आपल्याच धुंदीत रंगपंचमी खेळण्यात व्यस्त असतात. मात्र,याला अपवाद असल्याचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्यावरून नुकतेच निदर्शनास आले आहे.एका शेतकऱ्यास नाहक बेदम मारहाण केल्याने त्यांनी याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित केला.प्रकरणी बोर व्याघ्र प्रकल्पातील बफरक्षेत्राचे हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आदेश काल मंगळवारी सायंकाळी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक,वर्धा येथील कार्यालयाला प्राप्त झाला.अभय ताल्हण यांना निलंबन कालावधीत बोर व्याघ्र प्रकल्पाचे वर्धा येथील उपसंचालक कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे.वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हिंगणी वनपरिक्षेत्रातील बोरगाव (गोंडी) येथील एका शेतकऱ्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.पण,या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात हयगय करण्यात आल्याचा ठपका ठेवत खरांगणाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना सोमवारी १७ मार्चला पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी निलंबित केले,तर आता काल, मंगळवारी १८ मार्चला हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांना निलंबित करण्यात आले आहे.
जंगलाला आग लावल्याचा आरोप करीत बोरगाव (गोंडी) येथील शेतकरी नारायण कौरती यांना वन परिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण,अनिल काळे,गोविंद चंद्रवंशी,दुर्गाप्रसाद अंभोरे यांनी मारहाण केली. शेतकऱ्याला मारहाण करणे हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत आमदार सुमित वानखेडे यांनी विधिमंडळात मुद्दा उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी केली.त्यानंतर वर्धेचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी खरांगणाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवून सोमवारी निलंबित केले तर काल मंगळवारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!