- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.महामार्गाच्या विस्ताराला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन मोजणी केली जात असून पोलिस बळाचा वापर होत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत.सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये,अशी मागणी त्यांनी केली.काही मोजक्या कंत्राटदार आणि उद्योगसमूहांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबविला जात असेल,तर तो जनहिताचा विकास ठरू शकत नाही.सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,असाही इशारा वडेट्टीवार यांनी दिला.त्याचबरोबर,देशाच्या भविष्यासाठी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांना देशद्रोही ठरवणे दुर्दैवी असल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.नाशिक कुंभमेळ्यासाठी स्थानिक विकासाकडे दुर्लक्ष करून सुरू कंत्राटी व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ठराविक कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कुंभमेळ्याच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप करत किमान रस्त्यांची कामे तरी दर्जेदार करावी,अशी मागणी त्यांनी केली.
- Advertisement -

