Thursday, August 27, 2026
Homeनागपूरबापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या इसमाच्या जळालेल्या चितेजवळ पूजेचे साहित्य,लिंबू,रंगीबेरंगी धागे,एका बाटलीत गोमूत्र, पाण्याची बॉटल तसेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे अंगावरील कपडे आणि बूट अस्ताव्यस्त पडलेले दृश्य पाहून कुटुंबीय तसेच नातेवाईकांची काहीकाळ भंबेरी उडाली.सदरची घटना कुही तालुक्याच्या साळवा गावात नुकतीच उघडकीस आली.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवार २४ ऑगस्ट रोजी साळवा गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. निधन झाल्यानंतर कुटूंबीय,नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी मिळून स्थानिक स्मशानभूमीत अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.त्यानंतर,काल,मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कुटूंबीय तसेच नातेवाइक अस्थी(राख)संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता समोरील दृश्य बघताच थरकाप उडाला.चितेजवळच एका अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे दिसून आले.सदरची धक्कादायक माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि विविध चर्चांना उधाण आले.या प्रकाराची माहिती मिळताच कुही पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी भयभीत न होता अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये,असे स्पष्ट केले.तर कुही पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांना तक्रार देण्यास सांगितले.मात्र,काही जाणकारांच्या मते, अघोरी पूजेच्या कथित पद्धतीनुसार अशी पूजा करतांना अंगावर एकही वस्त्र ठेवले जात नाही.तसेच,ही पूजा सुरू असतांना कुणाचा अडथळा आल्यास पूजा अपूर्ण राहते.रात्रीच्या वेळी ही पूजा सुरू असतांना कुणाची तरी चाहूल लागल्याने आपला भांडाफोड होऊ नये या भीतीने तो मांत्रिक स्वतःचे कपडे,बूट आणि पूजेचे सर्व साहित्य तिथेच सोडून उघड्या अंगाने पळून गेला असावा,असा कयास काही गावकऱ्यांनी व्यक्त केला.अश्यातच पूजा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे अंगावरील कपडे आणि बूट स्मशानभूमीत आढळून आल्याने नेमका तो व्यक्ती कोण?याचा तपास होणे गरजेचे आहे,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!