- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-‘प्रेम हे प्रेम असते’ प्रेमात कुठलीही सीमा नसते.एकदा प्रेमात पडले की सारे रान मोकळे असते. अशातच एकदा का प्रेमात दुरावा निर्माण झाला की त्याचा शेवट भयावह असते.अशीच प्रचिती एका प्रेमी जोडप्या बाबत घडल्याचे उघडकीस आले आहे.सुरुवातीला सुत जुळले आणि पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले व प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.अश्विनी बादुले वय २३ वर्षे,गरोबा मैदान,कापसी चौक,जुना बगडगंज, नागपूर असे मृत विवाहितेचे नाव आहे.७ जून २०२४ रोजी तिचा भावेशकुमार प्रेमचंद बादुले वय ३२ वर्षे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता.सुखाचा संसार होईल,अशी तिची स्वप्ने असतांना भावेशकुमारने मात्र लग्नानंतर काही दिवसांतच रंग दाखविण्यास सुरुवात केली.तो लहानसहान गोष्टींवरून वाद घालायचा.तिला शिवीगाळ करत मारहाण करायचा.त्याने तिला माहेरच्यांशी बोलण्यासदेखील मनाई केली होती.मागील काही दिवसांपासून त्याचा छळ वाढला होता.त्याने अनेकदा अश्विनीला मारहाण केली होती.यामुळे ती प्रचंड तणावात होती.लग्न झाल्यापासून अश्विनीला भावेशकुमार याने शारीरिक व मानसिक त्रास देत तिला मारहाण करून क्रूर वागणूक दिली.त्यानेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आई मालती कुकटे वय ५२ वर्षे,जयदुर्गानगर, पारडी यांनी केला.आरोपीला अटक करण्यात आली आहे.२४ जानेवारी रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास अश्विनीने घरच्यांना व्हिडीओ कॉल केला.त्यावेळी ती रडत होती.त्यानंतर तिने त्यांना मेसेजेस पाठविले.त्यात पतीच्या छळाबाबत सांगितले. रात्री ११ वाजेच्या सुमारास तिने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.अश्विनी व तिचा पती दोघेही उच्चशिक्षित आहेत.नोकरीच्या निमित्तानेच त्यांची मैत्री झाली होती. भावेशला तिच्या माहेरच्यांचा राग यायचा व त्यातूनच तो अश्विनीला आई-वडिलासह भावाशी बोलण्यास मनाई करीत होता.लग्न झाल्यानंतर भावेशने अश्विनीला नोकरी सोडण्यास सांगितले.भावेशच्या आईकडून अश्विनीला नेहमी टोमणे मारण्यात यायचे.
- Advertisement -

