Thursday, September 10, 2026
Homeनागपूरपोलीस हवालदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या..

पोलीस हवालदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका ४५ वर्षीय पोलीस हवालदाराने नागपूरच्या अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिलरत्न भीमराव बेलेकर वय ४५ वर्षे,रा.वाघदरी इसासनी असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून अलीकडेच काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून त्यांची बदली होऊन प्रतापनगर पोलीस ठाण्यात झाली होती.प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
शिलरत्न यांचा पत्नीशी गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.त्यामुळे ते दोन्ही मुलांसह इसासनी भागातल्या वडिलोपार्जित घरी रहात होते.त्यांचा एक मुलगा आठवीत तर दुसरी मुलगी चौथीच्या वर्गात शिकते.गेल्या काही दिवसांपासून पत्नी मुलांचा ताबा मागत असल्याने शिलरत्न नैराश्यात गेले होते.१९ फेब्रुवारीपासून ते पोलीस ठाण्यात गैरहजर होते.दरम्यान घरीही नसल्याने त्यांच्या भावाने तीन दिवसांपूर्वी शिलरत्न बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान,काल सकाळी अंबाझरी तलावात पोहत असलेल्या काही तरुणांना एक मृतदेह दिसला.त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह तलावाबाहेर काढून तपासणी केली असता त्यात शिलरत्नचे ओळखपत्र सापडले. अंबाझरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवला.घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून प्रकरणाचा पुढील तपास अंबाझरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!