Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरपत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

पत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या माहेरी परतली होती.माहेरी आल्यानंतरही तिच्या मनातील अस्वस्थता कायम होती.एकांतवासात तिने पुन्हा एकदा आपला संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पतीला वारंवार फोन लावले,मनातील संवाद साधू इच्छिणाऱ्या मैत्रिणींनाही संपर्क केला.मात्र,पतीने एकही कॉल उचलला नाही.कोणाशीही संवाद न झाल्याने आणि पतीने प्रतिसाद न दिल्याने उदासीन झालेल्या पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला.तत्पूर्वी तिने एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली,ज्यात तिने ‘आय लव्ह यू संदीप’ म्हणत आपल्या प्रेमाची साक्ष दिली आणि पतीच्या वागण्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट करून राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.मयुरी संदीप मेंढे वय ३४ वर्षे,(माहेरचे नाव मयुरी राष्ट्रपाल मानवटकर, रा.महादुला (कोराडी),ता.कामठी,जि.नागपूर असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून मयुरीचा विवाह काही वर्षापूर्वी वर्धा येथील संदीप शालिक मेंढे यांच्याशी झाला होता. दोन दिवसांपूर्वी महादुला येथील बौद्ध विहारात कार्यक्रम असल्याने घरातील सर्व मंडळी तिथे गेली होती. मयुरी घरी एकटीच होती.रात्री घरची मंडळी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता.अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मयुरीच्या आत्महत्येमुळे तिचे माहेरचे कुटुंब हादरले आहे.मयुरीला पतीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता,त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले,असा थेट आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून ती चिठ्ठी जप्त केली असून,मयुरीचा भाऊ सुहास याच्या तक्रारीनंतर कोराडी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!