- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी पत्र परिषद घेत महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्यानुसार राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मत मोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.अशातच अनेकांच्या मनात आचारसंहिता केव्हा लागू होते व किती दिवस आचारसंहिता असते.असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन सोडत असतात.तर या बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
देशात दर पाच वर्षांनी लोकसभा,विधानसभेच्या निवडणुका होतात.वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू होते.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणी होईपर्यंत सुरू राहते.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही.याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले,विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही.आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा,पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय,कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा,धर्म,जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे.निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत.त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते.आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्या संबंधित उमेदवाला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते.उमेदवाराने अथवा राजकीय पक्षाने नियम मोडल्यास गंभीर गोष्ट असेल तर त्या पक्षावर किंवा उमेदवारावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.इतकेच नव्हे तर संबंधिताला कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.
- Advertisement -

