Friday, June 12, 2026
Homeनागपूरअखेर आंघोळीसाठी नहरावर गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह...

अखेर आंघोळीसाठी नहरावर गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पोहण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी घोटीटोक (बोरी),ता.रामटेक,जि.नागपूर शिवारातील पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात सोमवारी १४ ऑक्टोंबरच्या सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उड्या घेतल्या आणि चौघेही पाण्याच्या प्रवाहात आल्याने वाहत गेले त्या चौघांचाही बुडून मृत्यू झाला असून,त्यांचे मृतदेह काल,मंगळवारी सकाळच्या  सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.
मृतांमध्ये मनदीप अविनाश पाटील वय १७ वर्षे,अनंत योगेश सांबारे वय १३ वर्षे,मयंक कुणाल मेश्राम वय १४ वर्षे व मयूर खुशाल बांगर वय १५ वर्षे सर्व रा. नागपूर या चौघांचा समावेश असून,ते घोटीटोक (बोरी) येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहायचे आणि शिक्षण घ्यायचे. आठपैकी पाच विद्यार्थी या कालव्यात पोहण्यासाठी उतरले होते.यातील कमलेश बाळू देऊलकर वय १४ वर्षे,रा.नेरला,ता.मौदा याने पोहत काठ गाठल्याने तो थोडक्यात बचावला.उर्वरित चौघे वाहत गेले.पोलिस व महसूल विभागाने लगेच त्यांची शोध मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. अंधारामुळे थांबविलेली शोध मोहीम मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. एसडीआरएफच्या जवानांसोबत स्थानिक मच्छीमारांचीही मदत घेण्यात आली होती.उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,तहसीलदार रमेश कोळपे, ठाणेदार आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनात शोध कार्य पार पडले.रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम आटोपल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.प्रियंका योगेश सांबारे यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी वसतिगृह अधीक्षक धनराज महादुले, चौकीदार कैलास वाळवे व चपराशी प्रशांत पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे सहकलम ७५,८२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सर्व जण एकाच वसतिगृहात राहात असले तरी वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायचे.अनंत सांबारे हा महादुला,ता.रामटेक येथील संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर हायस्कूलमध्ये,मनदीप पाटील हा रामटेकातील नरेंद्र तिडके महाविद्यालयात तर मयंक मेश्राम व मयूर बांगर हे दोघे घोटीटोक येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शिकायचे.वसतिगृहात विद्यार्थ्यांना मारहाण करीत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असून,त्यांना शिळे अन्न खायला दिले जात असल्याची तक्रार प्रियंका सांबारे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!