Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद जो पर्यंत संपुष्टात येणार नाही,तोपर्यंत शांत बसणार नाही.देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे,हे सरकारचे ध्येय आहे.या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे,परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही.नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील.ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही.आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण करावे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची तारीख निश्चित केली आहे.या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलतांना शाह म्हणाले की,नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार व्हावे.ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल.अन्यथा समूळ उच्चाटन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!