Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
देसाईगंज रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ मार्गावर मोठे खड्डे पडले असून,पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अपघाताची शक्यता तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी सदर अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कालावधीत प्रवासी बसेस,पाणीपुरवठा, महावितरण दुरुस्ती,रस्ते दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई असेल.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८,भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!