- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-येत्या पुढील काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(शरदचंद्र पवार गट)झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण जागा पूर्ण ताकदिने लढवू,अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी स्पष्ट केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी तसेच कार्यर्त्यांची नुकतीच देसाईगंज शहराच्या विश्रामगृहात आगामी निवडणुका संदर्भात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात केवळ दोनच पक्ष जिवंत आहेत की काय? असे दिसून येत आहे.राज्य स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंतची कुठलीही निवडणूक असो भाजप आणि काँग्रेसचा ‘मी पणा ‘ दिसून येतो.त्यामुळे अश्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे.असेही क्षितिज उके म्हणाले.नुकतेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. देसाईगंज तालुक्यातील पंचायत समितीचे घोषित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार कोरेगाव- सर्वसाधारण, डोंगरगाव(हलबी)-अनुसूचित जमाती महिला,विसोरा-सर्वसाधारण,सावंगी- सर्वसाधारण महिला,कुरूड- अनुसूचित जाती महिला तर कोकडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.तर जिल्हा परिषद क्षेत्राकरिता कोरेगाव-डोंगरगाव(हलबी)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, विसोरा-सांवगी- नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला तर कुरुड-कोकडी-सर्वसाधारण आरक्षण सोडत निघाली आहे. अश्यातच देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण गटातील जागा शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी लढविण्याची तयारी दर्शविल्याने तालुक्याच्या राजकारणात यंदा नवे समीकरण पहावयास मिळणार आहे.त्यामुळे यंदाचा बाजिगर ‘जनशक्ती की धनशक्ती’ हे सांगणे अवघड आहे.
- Advertisement -

