Friday, April 10, 2026
Homeब्रम्हपुरीतुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी...

तुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी केली निवेदनाद्वारे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रह्मपुरी :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर झाले होते.त्यात नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे पद होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यामुळे हल्ली राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच पद निर्माण करण्यात यावे; याबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी येथील सरपंच संघटनेने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे

भारतीय संविधानानुसार लोकशाही व्यवस्थेत लोकसभा,राज्यसभा तर राज्यात विधानसभा व विधानपरिषद या सभागृहातून राज्याचा चालवला जातो.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावखेड्याचा विकासात्मक कारभार केला जातो. त्याकरिता ग्रामपंचायतमध्ये दर पाच वर्षांत निवडणुका घेऊन सरपंच,उपसरपंच यांची निवड करून विकासात्मक कारभार चालवला जातो. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्याचा कारभार चालविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या नियंत्रणात मंत्रिमंडळ व उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यात आले होते.त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कारभार चालवीत होते.मात्र नुकतेच शिंदे फडणवीस सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार ते सरकारमध्ये सामील झाले.याच धर्तीवर ग्रामपंचायती मध्ये सुध्दा दोन उपसरपंच पद निर्माण करावे; अशी मागणी सरपंच संघटनेंनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!