Tuesday, March 25, 2025
Homeगडचिरोलीतुम्हाला हे ठाऊक आहे काय? सात बाऱ्यावर वारसानांची नावे चढवायची असल्यास कुठल्याही...
spot_img

तुम्हाला हे ठाऊक आहे काय? सात बाऱ्यावर वारसानांची नावे चढवायची असल्यास कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही…- शेतकरी बांधवांची होतेय लूट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त (संपादकीय)

गडचिरोली :- कित्येकदा वारसान फेरफार नोंदी करिता आपण ऐकत असतो की, कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे शेतजमीन आहे;असा व्यक्ती मरण पावल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे सात बाऱ्यावर नाव नसल्यास नावे चढविण्यासाठी

एवढे पैसे लागतात वा तेवढे पैसे लागतात म्हणून असे कुणीही सांगत असेल तर तो आपल्याला चुना लावत आहे;असे समजावे.सात बाऱ्यावर कुटुंबातील व्यक्तींचे नावे चढविणासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही.कुणी जर का पैसे मागत असेल तर संबंधित व्यक्तीच्या विरोधात सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करा.गुगलवरती सर्च इंजिनमध्ये जिल्ह्याचे नावासोबत एसीबी असे टाईप करा व सरळ तक्रार करा.

बऱ्याच पैकी शेतकऱ्यांनी पैसे लागतात म्हणून कुटुंबातील वारसांनाची नावे सात बाऱ्यावर अनेक महिन्यांपासून वा वर्षांपासून चढविलेली नाहीत.कारण की आम्हाला याची माहितीच नसल्याने असे होते आहे.याकरिता वारसान नोंदीची प्रक्रिया कागदपत्रे गोळा करणे व संबंधित साज्यातील तलाठ्यास नेऊन देणे असून त्याकरिता कुठलीही फी वा पैसे लागत नाही.वारसान फेरफार नोंदी करीता फेरफार अर्ज,पाच रुपयाची तिकीट,जी व्यक्ती मयत झाली अशाचा मृत्यू दाखला,अर्ज दाराची एक फोटो,चालू सात बारा,वारसान प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच,पोलीस पाटील यांचा,नावे चढविणाऱ्यांची आधार कार्ड,नावात बदल असेल तर १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर,जसे-लग्न झाल्यानंतर नावात बदल होतो;एवढी कागदपत्रे गोळा करून गावातील तलाठ्यास सादर करावे.वारसान फेरफार नोंदी करीता कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.

आम्हाला हीच गोष्ट माहित नसल्याने वा शेतकरी बांधव निरक्षर असल्याने त्यांची फसवणूक केली जात आहे.एका व्यक्तीने चक्क सात बाऱ्यावर नाव चढवून देतो; असे म्हणून दोन ते दीड हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले.अशाप्रकारे कित्येकदा अनेकांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याचे काम सुरू असल्याने कुणाच्याही भानगडीत न पडता;आपले काम स्वतः वा योग्य व्यक्तीला पकडूनच करावे. जेणेकरून आपली फसवणूक टाळता येईल.जो कुणी पैसे मागीत असेल त्याला आणून देतो वा नंतर देतो म्हणून सांगा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवून ‘दे बत्ती’ असे करावे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!