Thursday, May 21, 2026
Homeगडचिरोलीबसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

बसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एसटी महामंडळाच्या बसचा आज, गुरुवारच्या सकाळी भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला,तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळणावर घडली.अपघातात सात वर्षीय शिवांश स्वप्नील नवघरे,ख्वाजा शाहबुद्दीन वय ६० वर्षे व लक्ष्मीबाई दुरकीवार वय ५५ वर्षे अशी मृतांची नावे आहेत.तर अपघातातील जखमी बस चालक रोहित देशमुख रा.अकोला,श्वेता स्वप्नील नवघरे रा.चामोर्शी, डॉ.गणेश जैन रा.गडचिरोली,वाहक संदीप प्रल्हाद पवार, ऋषभ खडके,सचिन वाळके,जयश्री वरभे,सचिन वरदे, जयश्री खाणके,रत्नाकर राऊत,पार्थ राऊत,मंगला कळसकर,भूषण दुरकीवार,विकी सुरेश शेंडे,तारा साबळे, श्रीहरी खळकर,बेबीबाई खळकर,चैतन्य मेडीवर,तानिया मेडीवर,वैशाली माडेवार,रूपाली खणके,ललिता खणके, धनश्री ललित चांदेकर,आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे,संगीता बाबुराव कांबळे,ज्योती अविनाश पाल सर्वजण यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील रहिवासी आहेत.तर व्यंकट ढगे,सुमन कत्तलवार, गौरव कुमरे,अश्विनी तोरपे यांच्यासह अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत.
आज सकाळच्या सुमारास एमएच १४ बीटी-०७४० क्रमांकाची बस गडचिरोली आगारातून चंद्रपूर मार्गाहून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडकडे निघाली होती. सुरळीत प्रवास सुरू असतांनाच सकाळी साडे सातच्या सुमारास गडचिरोलीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळण मार्गावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बसने मार्गावरील लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी घेतली.अपघात घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.प्रवाशांनी मोठ्याने आवाज करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले.काही प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेनंतर एसटीच्या सुरक्षिततेबाबत  प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात...

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक-२०२६ संपन्न; राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध.. – शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाचा खरीप हंगाम एल निनो,बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून,शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा,योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा...

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेली ‘ती’ परतलीच नाही; १८ वर्ष व्हायला अवघे १५ दिवस होते बाकी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-पाच दिवसांपूर्वी घरा शेजारी असलेल्या एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी अजूनपर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांना मुलीची चिंता सतावत आहे.विशेष...

रब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-परिसरात रब्बी हंगामातील धानाची कापणी झाली असल्याने मोठ्या प्रमाणात धान विक्री करीता बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र,शासनाकडून अद्यापही धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!