Wednesday, March 26, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्ततुम्हाला हे ठाऊक आहे काय?तुमच्या ट्रेनच्या तिकिटावर असतोय विमा…- प्रवासादरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास;...
spot_img

तुम्हाला हे ठाऊक आहे काय?तुमच्या ट्रेनच्या तिकिटावर असतोय विमा…- प्रवासादरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास; पीडितेच्या कुटुंबाला मिळतेय १० लाख रुपयांची भरपाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- भारतातील मोठ्या लोकसंख्येसाठी ट्रेन हे मुख्य प्रवासाचे साधन आहे. जरी विमान भाडे आता कमी झाले असले तरी.पण आज भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात.तुमच्यापैकी अनेकांना हे देखील माहित असेल की तुमच्या ट्रेनच्या तिकिटावर विमा असतो. प्रवासादरम्यान तुमचा मृत्यू झाला; तर तुमच्या नॉमिनीला विमा कंपनीकडून भरपाई मिळते.पण रेल्वे अपघातात जखमी झाल्यावर त्या परिस्थितीत काय होईल? त्यामुळे तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल का?

वास्तविक,जेव्हा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करता; तेव्हा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्या तिकिटाचा विमा काढला जातो.ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर,तुम्हाला एक ईमेल प्राप्त होतो. ज्यामध्ये विम्याचा तपशील असतो.

प्रवासादरम्यान तुम्हाला दुखापत झाल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास,विमा कंपनी तुमच्या उपचाराचा खर्च उचलते.जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याच्या उपचारासाठी आवश्यक असलेली २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा कंपनी देते.जर एखादी व्यक्ती अंशतः अपंग असेल, तर ही रक्कम ७.५ लाख रुपयांपर्यंत वाढते. भारतीय रेल्वे वेळोवेळी लोकांना या सुविधांबद्दल जागरूक करते.

जर प्रवासादरम्यान रेल्वे अपघातात एखादी व्यक्ती पूर्णपणे अपंग झाल्यास, त्या प्रकरणात १० लाख रुपयांची भरपाई दिली जाते.अशा परिस्थितीत,जर तुम्हाला विम्याचा लाभ हवा असेल,तर तुम्हाला तिकीट बुक करताना एका पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये असे सांगावे लागेल की होय,मला विम्याची सुविधा हवी आहे.तिकीट बुक करताना तुम्ही तुमच्या नॉमिनीचा तपशील भरावा.असे न केल्यास नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येऊ शकते.

किरकोळ दुखापत आणि गंभीर दुखापत ही बाब आहे.पण रेल्वे अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला किती पैसे मिळतात? प्रवासादरम्यान अपघात किंवा आपत्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई दिली जाते.या स्थितीतही,भरपाईची सुविधा मिळविण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील भरणे आवश्यक आहे.जर तुम्ही असे केले नाही, तर तुमच्या निधनानंतर कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणे कठीण होते.ही सुविधा फक्त प्रवासासाठी आहे.म्हणजे ज्या स्थानकावरून तुम्ही प्रवास सुरू करता आणि तो कुठे संपतो.तुमच्या शेवटच्या स्थानकानंतर कोणतीही आपत्ती आल्यास ही सुविधा मिळणार नाही.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने आज,बुधवार २६ मार्च रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६...

तरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा,पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या...

भंडाऱ्याच्या महिला तहसिलदारांची उचलबांगडी.. – बदलीसह विभागीय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-अधिकार क्षेत्राबाहेरील कार्य करणे,भंडारा तहसीलच्या महिला तहसीलदार विनिता लांजेवार यांना चांगलेच भोवले आहे.प्रकरणी भंडाऱ्याच्या महिला तहसिलदारांची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उचलबांगडी...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले…

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनुले यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!