Sunday, April 19, 2026
Homeपुणेतळ्यात पोहायला गेले; पण दमछाक होऊन मृत्युमखी पडले.. - चार शालेय विद्यार्थ्यांचा...

तळ्यात पोहायला गेले; पण दमछाक होऊन मृत्युमखी पडले.. – चार शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात(गाव तलाव)पोहायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांचा पोहतांना दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ३१ मे रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.१.ओमकार बाबासाहेब हंगे वय १३ वर्षे,हल्ली रा.मार्तंडनगर,मेदनकरवाडी,मूळ रा.हंगेवाडी,ता.केज,जि.बीड.२.श्लोक जगदीश मानकर वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती.३.प्रसाद शंकर देशमुख वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.अंबुलगा,ता.मुखेड, जि.नांदेड.४.नैतिक गोपाल मोरे वय १३ वर्षे,हल्ली रा. मेदनकरवाडी,मूळ रा.बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट, जि.अकोला,असे तळ्यात बुडून मृत्यु झालेल्या शालेय विद्यार्थ्यांची नावे आहेत.

वरील चारही शालेय विद्यार्थी आज शनिवारी मौज- मजा म्हणून सकाळच्या सुमारास साडे अकरा वाजेच्या दरम्यान घरून चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात पोहायला गेले होते.पोहण्यासाठी तळ्यात उतरले.पण तळ्यात पाणी जास्त असल्याने पोहतांना चौघांनाही दमछाक झाली.त्यामुळे बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असतांनाच चौघांचाही बुडून मृत्यू झाला होता. लागलीच बराच वेळ होऊनही चौघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.अशातच गाव तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे आढळून आले.त्यानुसार स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!