- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याच्या सालईमेंढा तलाव परिसरात घडली.आदित्य रामचंद्र चहांदे वय १९ वर्षे,रा.राजीवनगर,एमआयडीसी, नागपूर व अभिषेक अमीरचंद सिरसाम वय १९ वर्षे, रा.सिंदेवाही,जि.चंद्रपूर,हल्ली मुक्काम रॅमसन कंपनी,निलडोह,हिंगणा अशी मृतक तरुणांची नावे आहेत.
हिंगणा तालुक्यातील रॅमसन कंपनीमध्ये काम करणारे आदित्य,अभिषेक,आकाश मतचिरके,नयन सहारे व यश भारद्वाज हे पाचही मित्र काल बुधवारची सुट्टी असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींवरून सालईमेंढा तलाव परिसरात गेले होते. दरम्यान,आदित्य व अभिषेक हे दोघेही तलावातील पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरले.मात्र,त्यांना खोल पाण्याचा अंदाज न दोघेही तलावातील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.अश्यातच तलावाच्या काठावर असलेले तीन मित्र घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.त्यातच,तिन्ही मित्रांना पोहता येत नसल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले.याचवेळी आकाश मतचिरके याने तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागितली.त्यानंतर,हिंगणा पोलिस आणि नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधकार्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधकार्य राबविल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह रात्री साडेसात वाजेच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आले.प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
- Advertisement -

