- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एचएसआरपी(HSRP)नंबर प्लेट बसवणे आता अनिवार्य झाले आहे.यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ देण्यात आला होता.मात्र,अनेक वाहनधारकांनी अजूनही ही प्लेट बसवलेली नसल्याचे समोर आले आहे.ही मोठी संख्या पाहता आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता ही मुदत सहा महिन्यांनी वाढवून ३० जून २०२६ पर्यंत केली आहे.विशेष म्हणजे,वाहन चोरीच्या घटना रोखणे,बनावट नंबर प्लेट्सचा वापर थांबवणे आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर टाळणे यासाठी एचएसआरपी ही एक अत्यंत सुरक्षित यंत्रणा आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई केली जात असून,यामुळे वाहनांची ओळख अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे.ज्या वाहनधारकांनी या मुदतीत आपली प्रक्रिया पूर्ण केली नाही,त्यांना १ जुलै २०२६ पासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.१ जुलैपासून राज्यभरात रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल,ज्या गाड्यांना नवीन प्लेट नसेल किंवा ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली नसेल,त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे.त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- Advertisement -

