Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.. -...

तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.. – तहसीलदाराच्या घरीच सापळा कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रेतीघाट सुरू तर होतात,मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध वाळू उपश्याचा खेळ सुरू होऊन पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात आहे.त्यांना कुणाशी काहीही देणे-घेणे नसते.बेसुमार उपश्यामुळे तिकडे शेतकऱ्यांच्या विहिरी तळाला लागोत वा नळ योजनेचा पाणीपुरवठा प्रभावित होऊन गेला तरी चालेल.अश्यांना केवळ छपाई केंद्र कुठून होतो,याचेच भान असते.लाखो रुपयांचा महिन्याकाठी मिळणारा पगारही विविध विभागातील अधिकाऱ्यांना कमीच पडतो आहे.अश्याच प्रकारे एका सुटबुटवाल्या तहसीलदाराला पैश्याची हाव सुटल्याने त्याने चक्क अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना आज, शनिवार ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.सदरची सापळा कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवाल मारव्हल सोसायटी,रो हाऊस नंबर ११९ येथे वास्तव्यास असणाऱ्या जालना जिल्ह्याच्या अंबड तहसील कार्यालयाचा तहसीलदार विजय चव्हाण याच्या घराच्या मुख्य गेटवरच कारवाई करण्यात आली.प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे सहा हायवा गाड्या असून ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या परिसरातून अधिकृत व अनधिकृत वाळू उपसा तसेच वाहतुकीचा व्यवसाय करतात.या गाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने महिण्याला तब्बल सात लाख रुपयांची मागणी केली होती.याबाबत चव्हाण याने २६ मे २०२६ रोजी सौदा केला होता; मात्र नेमक्या त्याच काळात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू झाल्याने यात खंड पडला.दरम्यान,पैश्याची मोठी हाव सुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्याने तक्रारदाराकडे पैशांसाठी तगादा लावला.परत तहसीलदार चव्हाण याने आज शनिवारी लाचेच्या रकमेची मागणी करत तक्रारदाराला थेट छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी पैसे घेऊन बोलावले.त्यानुसार,तक्रारदार लाखोंची रक्कम आणि बीड एसीबीच्या पथकासह छत्रपती संभाजीनगरला पोहोचले.येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो आपल्या सोसायटीच्या मुख्य गेटबाहेर आला आणि तक्रारदाराने त्याच्या हातात ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची बॅग सुपूर्द करताच,बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वरच्या कमाईशिवाय पोटच भरत नाही वाटते.लाचप्रकरणी लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याचेवर छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!