Tuesday, March 18, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तटीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा...
spot_img

टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- विश्वचषकातील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला.

बांगलादेश प्रथम फलंदाजी करत भारताला २५७ धावांचे आव्हान दिले होते.बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा,शुबमन गिल,विराट कोहलीने दमदार खेळी खेळली. बांगलादेशने दिलेले आव्हान भारताने ४१.३ षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले.या डावात विराट कोहलीने शानदार शतक ठोकले.

विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.या शतकात ६ चौकार आणि ४ षटकारांचा सामावेश आहे.तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावा कुटल्या.कोहली आणि राहुलने चौथ्या गडीसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी रचली.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा चोपल्या.बांगलादेशच्या तंजीद हसन आणि लिटन दासने पहिल्या विकेटसाठी ९३ धावा कुटल्या.तंजीद खान ५१ धावांवर पायचीत झाला.तर लिटने ८२ चेंडूत ६६ धावा कुटल्या.महमूदुल्लाहने ४६ धावांचे योगदान दिले.बांगलादेशच्या लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या.तर भारतासाठी मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.या विजयामुळे टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!